शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प

By admin | Published: June 03, 2017 1:31 AM

भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या

सेंट पीटर्सबर्ग : भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च ५० हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी येथे झालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअ‍ॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली. या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एनपीसीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. के. शर्मा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. संपूर्ण प्रकल्पासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च येणार असून, पहिला संच ६६ महिन्यांनी तर त्यानंतर दुसरा संच सहा महिन्यांनी कार्यान्वित होईल. या रिअ‍ॅक्टर्सची बांधणी रशियाच्या न्यूक्लिअर कॉर्पोरेशनची शाखा रोसॅटोमकडून होईल. या प्रकल्पाचे स्वरूप ७० टक्के कर्ज व ३० टक्के हिस्सा असे असेल, असे शर्मा म्हणाले. रशियाचे सरकार भारताला बांधकामासाठी ४.२ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देईल. रशियाचे अत्यंत आधुनिक, विश्वासार्ह तंत्रज्ञान या बांधकामासाठी वापरले जाणार आहे. सेंट पीटर्सबर्ग डिक्लरेशनमध्ये राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्तुळात द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. व्यापारवृद्धीसाठी प्रोत्साहन, त्याच्या रचनेत सुधारणा आणि औद्योगिक सहकार्य विस्तारणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)क्षेपणास्त्र यंत्रणा...भारताला रशिया एस-४०० ट्रायंफ ही विमानविरोधी क्षेपणास्त्र व्यवस्था पुरवण्याची तयारी करीत आहे. दोन्ही देश या विक्री व्यवहाराच्या स्वरूपावर चर्चा करीत आहेत, असे रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांनी म्हटले. एस-४०० विमानविरोधी क्षेपणास्त्र सिस्टीम पुरविण्याच्या कराराच्या आधीची तयारी सध्या सुरू आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांत करार झालेला असून आम्ही त्यावर आता निव्वळ अटींची चर्चा करीत आहोत, असे रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘तास’ने रोगोझिन यांचा हवाला देऊन म्हटले.उभय देशांत व्यापार आणि आर्थिक करारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून विमाने आणि स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्याचे त्यांनी मान्य केले आहे.व्लादिमीर पुतीन यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर सांगितले की, ‘‘रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढीच्या मार्गावर परतत आहे. हा सकारात्मक कल बळकट करणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. आमची चर्चा ही नेहमीच मित्रत्वाच्या वातावरणात व ठोस व उत्पादक झालेली आहे. ही चर्चादेखील त्याला अपवाद नाही.’’