शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:36 IST

सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत...

वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. यात एकूण १४ बदल करण्यात आले आहेत. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात सादर केला जाईल. सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत.

वक्फ दुरुस्ती विधेयकाची तपासणी करत असलेल्या संयुक्त संसदीय समितीने सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सदस्यांनी प्रस्तावित केलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आहेत. तर, विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळून लावल्या आहेत. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समितीने स्वीकारलेल्या सुधारणांमुळे कायदा अधिक चांगला आणि प्रभावी होईल, असे जगदंबिका पाल यांनी म्हटले आहे.

विरोधकांचे आरोप -विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीच्या कामकाजावर टीका करत, पाल यांच्यावर "लोकशाही प्रक्रिया कमकुवत केल्याचा" आरोप केला आहे. पत्रकारांसोबत बोलतान टीएमसी खासदार कल्याण बनर्जी म्हणाले, "ही बैठक म्हणजे केवळ दिखावा होता. आमचे काहीही ऐकले गेले नाही. पाल यांनी हुकूमशाही पद्धतीने काम केले." दरम्यान, पाल यांनी हे आरोप फेटाळून लावत संपूर्ण प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच पार पडली आणि बहुमताने निर्णय घेण्यात आला, असे म्हटले आहे.

44 प्रस्तावांपैकी केवळ 14 बदल मंजूर -समितीसमोर बदलांसाठी एकूण ४४ प्रस्ताव सादर करण्यात आले होते, परंतु केवळ १४ प्रस्तावांनाच मंजुरी देण्यात आली. पाल म्हणाले, विरोधी सदस्यांनी विधेयकाच्या सर्व ४४ कलमांमध्ये शेकडो सुधारणा प्रस्तावित केल्या होत्या, परंतु त्या मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. 

भाजपच्या सर्व 10 प्रस्तावांना मंजूरी -बैठकीत भाजप खासदारांनी १० दुरुस्त्या सुचवल्या होत्या आणि सर्व दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या. याच वेळी, विरोधकांकडून अनेक दुरुस्त्यादेखील मांडण्यात आल्या, परंतु मतदानानंतर त्या सर्व फेटाळण्यात आल्या. विरोधकांनी मांडलेल्या सर्व दुरुस्त्या १०-१६ मतांनी फेटाळण्यात आल्या. तर, भाजपच्या सर्व दुरुस्त्या १६-१० मतांनी स्वीकारण्यात आल्या आहेत.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसParliamentसंसद