शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

न्याययंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञान येणे आवश्यक

By admin | Published: April 03, 2017 4:55 AM

कैद्यांना तुरुंगातून न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची जबानी नोंदविण्याचा विचार व्हायला हवा.

अलाहाबाद : न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळायला हवी आणि कैद्यांना तुरुंगातून न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची जबानी नोंदविण्याचा विचार व्हायला हवा. नवीन तंत्रज्ञान आणि कालबाह्य कायदे रद्द करणे यांमुळे न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की कायदे जितके अधिक आणि किचकट वा क्लिष्ट असतात, तितका न्यायव्यवस्थेवर ताण अधिक असतो. या समारंभात सरन्यायाधीश जे. एस. केहर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सरन्यायाधीश केहर यांनी न्यायाधीशांची कमतरता आणि प्रलंबित खटल्यांची वाढती संख्या याविषयी चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडून पंतप्रधानांनी क्लिष्ट व कालबाह्य कायदे रद्द करणे आणि न्याययंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे यांवर भर दिला. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. गरिबांनाही कायद्यामुळे त्यांचे हक्क मिळायला हवेत, असे सांगताना मोदी यांनी महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा उल्लेख केला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील वकिलांच्या योगदानाविषयीही ते बोलले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कायदा हा सर्वोच्च असतो. कायद्यापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही आणि कायदा हा शासकांचाही शासक असतो, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अनेक न्यायाधीश तसेच वकील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. > १२00 कायदे रद्द केलेआमच्या सरकारने कालबाह्य कायदे रद्द करण्याचे ठरविले आणि आतापर्यंत असे तब्बल १२00 कायदे रद्द केले असून, आणखीही बरेच कायदे टप्प्पाटप्प्याने संपुष्टात आणले जातील. न्यायालयात सरकारी दाव्यांची संख्या प्रचंड असून, ती कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.