शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

By admin | Published: June 04, 2016 2:42 AM

मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टी आणि भाजपासह संपूर्ण विरोधकांनी समाजवादी पार्टीच्या सरकारवर मनमानीपणाचा आरोप लावून मुख्यमंत्री यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मथुरेतील घटना दुर्दैवी असल्याचे सांगून राज्यातील कायदा व व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचा आरोप केला. जवाहरबाग येथील घटना हे याचे उदाहरण असल्याचे मत त्यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना परिसरात शांतता प्रस्थापित करून दोषींवर कडक कारवाईची मागणी गांधी यांनी केली. बसपा प्रमुख मायावती यांनी ही घटना सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. धरण्याच्या निमित्ताने कब्जाअतिक्रमणकर्ते बाबा जयगुरुदेव समूहाचे असण्याची शंका आहे. धरण्याच्या बहाण्याने त्यांनी या जागेवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करा, विद्यमान चलनाच्या जागी आझाद हिंद फौजेचे चलन आणा आदी मागण्या ते करीत होते. याशिवाय एका रुपयात ६० लिटर डिझेल आणि ४० लिटर पेट्रोलची त्यांची मागणी होती. रामवृक्ष यादव, चंदन बोस, गिरीश यादव आणि राकेश गुप्ता हे मुख्य आरोपी आणि समूहाचे म्होरके असून जिवंत असल्यास त्यांना पकडण्यात येईल, असे महासंचालकांनी सांगितले. भाजपाने विचारले प्रश्न 1. या घटनेत वापरलेली शस्त्रास्त्रे तेथे आली कशी?2. सूत्रधाराबद्दल संपूर्ण माहिती असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही. 3. राज्यात पोलीसच सुरक्षित नाही मग जनतेचे काय?4. सपाचे सरकार आल्यापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात तीन पट वाढ झाली आहे. त्याचे काय?हेमा मालिनी शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्तमथुरेत हिंसाचार झाला असतानाही या क्षेत्रातील भाजपा खासदार हेमा मालिनी या मात्र टिष्ट्वटरवर चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे पक्षाला खजील व्हावे लागले. सोशल मीडियावर टीका होताच त्यांनी लगेच हे फोटो हटवून शहीद अधिकाऱ्यांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. अर्थात भाजपाने मात्र हेमा मालिनींची पाठराखण करताना त्या या घटनेबाबत संवेदनशील असल्याचा दावा केला. यावर राजकारण करू नये, असे मत प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.