शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

...ही तर फक्त सुरुवात; शेतकऱ्यांना कुणीच रोखू शकत नाही: राहुल गांधी

By मोरेश्वर येरम | Updated: November 27, 2020 16:46 IST

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांचं ऐकावच लागेल, राहुल गांधी कडाडलेशेतकऱ्यांना जगातील कोणतंच सरकार रोखू शकत नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा"शेतकऱ्यांवर घाव घालणारे कायदे मोदींना मागे घ्यावेच लागतील"

नवी दिल्लीकेंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी धोरणांच्याविरोधात 'चलो दिल्ली' आंदोलनत सहभागी झालेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रू धुराचाराही वापर करण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. 

''पंतप्रधानांनी लक्षात ठेवायला हवं जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या या लढाईत उतरलेल्या शेतकऱ्यांना जगातील कोणतच सरकार रोखू शकत नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावच लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे'', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरुन या शेतकऱ्यांना अटक करता येईल. पण दिल्ली सरकारने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे. 

''केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं पाप आम्ही करू शकत नाही'', असं दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. 

पंजाबमधून निघालेले शेतकरी हरियाणातून दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाले होते. काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी पानीपतपर्यंत पोहोचले होते. आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेत प्रवेश केला आहे. दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सिंधू सीमेवर झटापट झाली. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर करण्यात आला. पण या सगळ्याला न जुमानता शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीcongressकाँग्रेस