शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
2
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
3
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
4
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
5
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
6
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
7
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
8
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
9
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
10
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
11
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
12
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
13
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
14
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
15
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
16
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
17
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
18
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
19
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा

प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 1:50 PM

एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. वेल्लोर जिल्ह्यातील विनवमंगलम नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

जयगणेश हे त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होते. अशा परिस्थितीत घर चालवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली. त्यांना आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं होतं. ते अभ्यासात खूप हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही ते खचले नाहीत. आपल्या करिअरला आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. 

के जयगणेश यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळपास ९२ टक्के गुण मिळाले होते. यानंतर शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक कुटुंबही त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. आपल्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरची नोकरी सोडली आणि कलेक्टर होण्याची तयारी सुरू केली.

सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून केलं काम 

के जयगणेश यांनी यूपीएससी परीक्षेची माहिती गोळा केली. त्यानंतर चेन्नई येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तेथे फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा खर्च भागवण्यासाठी आणि UPSC कोचिंग फी भरण्यासाठी त्यांनी सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे त्यांना दरमहा तीन हजार रुपये पगार मिळत असे. २००४ मध्ये ते यूपीएससी परीक्षेत नापास झाले. यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या नोकरीचा राजीनामा दिला.

कोचिंग फीसाठी बनले वेटर 

यूपीएससीची परीक्षा सोपी नाही हे त्यांना समजलं होतं. याची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे तास वाढवावे लागतील. पण नोकरी सोडून फक्त अभ्यास करायचा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ते एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू लागला. पहिल्या दोन प्रयत्नात जयगणेश यांना यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. त्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये समाजशास्त्र शिकवायला सुरुवात केली.

सलग ६ वेळा नापास 

UPSC नागरी सेवा परीक्षेत ते सलग ६ वेळा नापास झाले. असं असूनही त्यांनी हार मानली नाही. ते त्यांच्या बाजूने तयारी करत राहिले. त्यांच्या मेहनतीचं फळ होतं की UPSC परीक्षेच्या ७ व्या प्रयत्नात ते UPSC प्रिलिम्स, UPSC Mains आणि UPSC मुलाखतीत यश मिळवू शकले. यामध्ये ते १५६ व्या रँकसह आयआरएस अधिकारी बनले. सध्या ते चेन्नई, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेशात एडिशनल सीआयटी (OSD) पदावर कार्यरत आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी