शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

IAS अधिकाऱ्याची 10 वर्षात 27 वेळा बदली; मानवाधिकार आयोगाकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 18:30 IST

के. मथाई सध्या कर्नाटक प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त पदावर आहेत. 

नवी दिल्ली : कर्नाटकमधील प्रशासकीय सेवेतील अधिकारी के. मथाई यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात  छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. इमानदारीत प्रशासकीय सेवा केल्यामुळे गेल्या दहा वर्षात 27 वेळा बदली करण्यात आल्याचा आरोप के. मथाई यांनी केला आहे. याशिवाय, त्यांची पदोन्नती, इंसेंटिव्ह आणि मिळणाऱ्या इतर सुविधा थांबविण्यात आल्या आहेत. के. मथाई सध्या कर्नाटक प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त पदावर आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मानवाधिकार आयोगाने के. मथाई यांचा तक्रार अर्ज मंजूर केला आहे. या तक्रारीत के. मथाई यांनी राज्याचे मुख्य सचिव विजय भास्कर यांच्यासहित दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. मंड्यामध्ये कार्यरत असताना 300 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच, बीबीएमपीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा समोर आणला होता. तेव्हापासून नेतेमंडळी आणि अधिकारी मला त्रास देत असल्याचे के. मथाई यांनी म्हटले आहे.  

के. मथाई म्हणाले, 'लोकायुक्तांनी माझे ऐकले नाही. मुख्य सचिवांनी सुद्धा कानाडोळा केला. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळे मी राज्य मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला. माझ्याजवळ कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.' दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकचे मुख्य सचिव विजय भास्कर यांनी नोटीस आल्यानंतर उत्तर देऊ असे म्हटले आहे. ते म्हणाले, 'याप्रकरणी अद्याप कोणतीही मला नोटीस आली नाही. ज्यावेळी नोटीस येईल, त्यावेळी उत्तर देऊ.'

टॅग्स :Karnatakकर्नाटक