शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:56 IST

स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.

नवी दिल्ली : १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी कोणते युद्ध झाले होते, असा सवाल अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या टीकाकारांना विचारला आहे. स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे अत्यंत वादग्रस्त उद्गार कंगना रणौतने नुकतेच काढले होते. त्यामुळे सर्वच स्तरांतून तिचा तीव्र निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कंगनाने म्हटले आहे की, महात्मा गांधी यांनी भगतसिंग यांना वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तसेच सुभाषचंद्र बोस यांनादेखील कधीही पाठिंबा दिला नाही. एका पुस्तकातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांची अवतरणे उद्धृत करून कंगना रणौत हिने सांगितले की, स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर यांनी मोठे योगदान दिले याची मला माहिती आहे. १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरात सर्वजण एकजुटीने लढले होते. मात्र १९४७ साली एखादे युद्ध झाले होते का, याबाबत मात्र मी अनभिज्ञ आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार