शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:22 IST

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. या आगीत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे पती-पत्नी आणि मोलकरणीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच घरातील पाळीव मांजराचाही मृत्यू झाला.

मृतांमध्ये काकादेवच्या पांडू नगर येथील रहिवासी बिस्कीट व्यावसायिक संजय श्याम दसानी, पत्नी कनिका दसानी आणि मोलकरीण छवी यांचा समावेश आहे. दिवाळीच्या दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर घरातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. संजय श्याम दसानी (48) हे त्यांची पत्नी कनिका श्याम दसानी आणि घरातील मोलकरीण छवी चौहान यांच्यासोबत पांडू नगर येथील एका घरात राहत होते. दिवाळीच्या दिवशी पूजेनंतर कुटुंबीय देवघरात दिवा लावून झोपले होते. मात्र याच दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला.

ही आग संपूर्ण खोलीत पसरली, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर घरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. रात्री १२ वाजल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसह अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीमही तेथे होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :fireआगHomeसुंदर गृहनियोजनUttar Pradeshउत्तर प्रदेश