शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 9:38 AM

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले.

कनकगिरी (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते केवळ नको ते मुद्दे उकरून काढत आहेत, मात्र ते ‘४० टक्के कमिशन’ घेणाऱ्या सरकारवर आणि जनतेच्या कामाबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे जनतेने कर्नाटकचे ‘अर्जुन’ होत केवळ आपले भवितव्य लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केले आहे. त्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. आज काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत, तिथेही त्यांची वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन सरकारच्या नावावर चालते ही खेदाची आणि शरमेची बाब नाही का?, असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या प्रश्नावर बोलागेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर मोठे नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. कधी ते धर्माबद्दल बोलतात, मात्र तुमच्या विकासाच्या कामाबद्दल बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष विचलित न करता भविष्य लक्षात घेत मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

कमिशनचे सरकार हे ठेकेदारांनी नाव दिलेइतर कोणत्याही पक्षाने भाजप सरकारला ४० टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले नाही. ते ठेकेदारांनी दिले आहे. त्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते. इतर अनेक भरतीत अनियमितता झाली आहे. या सरकारमध्ये प्रत्येक पदाचे रेट ठरलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी