शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

"माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन", कर्नाटकात काँग्रेस आमदार बीआर पाटील यांनी का दिली धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 6:40 PM

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कलबुर्गी : कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकमधील आमदार बी. आर. पाटील यांनी बंडखोर वृत्ती दाखवत राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बी. आर. पाटील यांनी 'स्वाभिमाना'चा हवाला देत राजीनामा देण्याचे भाष्य केले होते. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. जवळपास ३० आमदारांनी सिद्धरामय्या आणि पक्षनेतृत्वाला पत्र लिहून आपल्या मतदारसंघात विकासकामे न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आमदार बी. आर. पाटील म्हणाले की, काही मंत्र्यांच्या वागणुकीमुळे काही आमदार नाराज झाले आहेत. यात सुधारणा न झाल्यास आपला लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, गुरुवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबद्दल आणि तिथे काय घडले याबद्दल समाधानी असल्याचेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.

याबाबत विचारले असता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांच्यासह काही मंत्र्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माफी मागितली होती. दरम्यान, बी. आर. पाटील म्हणाले, "मी मीडिया आणि वृत्तपत्रांचे वृत्तही पाहिले आहे. कोणी माफी मागितली हे मला माहीत नाही. मी माफी मागितलेली नाही आणि माफीही मागणार नाही. आम्ही माफी मागावी असा आम्ही काही गुन्हा केला आहे की आमच्याकडून मोठी चूक झाली आहे." याचबरोबर, राजीनामा देणार असल्याचे बैठकीत सांगितले होते का? असे विचारले असता, "माझा स्वाभिमान दुखावला असेल तर मी राजीनामा देईन आणि जाईन, असे मी एका क्षणी सांगितले होते, असेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.

का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस