शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
3
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
4
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
5
रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
6
Vastu Tips: दररोज रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
7
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
8
'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?
9
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
10
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
11
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
12
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
13
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
14
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
15
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
16
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
17
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
18
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
19
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
20
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 2:10 PM

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. यापूर्वीच आमदारांकडून मंत्री आणि निधीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बीआर पाटील यांच्या नावाचे एक कथित पत्र व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी सरकारच्या मंत्र्यांबद्दल उघड नाराजी दर्शवली आहे. चर्चेविना अधिकाऱ्यांच्या बदल्या, विकासासाठी निधीचे वाटप न होणे आदी मुद्दे आमदारांनी उपस्थित केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही हाच मुख्य विषय असल्याचे सांगितले जात आहे.

का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. 

सरकार पाडण्याचे षडयंत्र - डीके शिवकुमारदरम्यान, आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षात नाराजी नसल्याचे सांगितले आहे. आमदारांनी केवळ आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. यामुळेच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावून आता सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, डीके शिवकुमार यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, परंतु हे षडयंत्र बंगळुरूऐवजी सिंगापूरमधून घडत आहे, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही.

बंडखोरीच्या बातम्या समोर येतायेतकर्नाटकमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत तर भाजपचे ६६ आमदार आहेत. काँग्रेससाठी सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान होते, कारण तेव्हा सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस