शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Karnataka Election 2023 : दिल्ली ते बंगळुरू चर्चांचं सत्र, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; त्या १०० तासांत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:00 IST

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. डीके शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झालाय. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत राहतील.

कर्नाटक ते दिल्ली १०० तास सुरू असलेल्या चर्चांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोनिया गंघी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचं म्हटलं जातंय. आता २० मे रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. मात्र, वेळोवेळी प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा मांडत राहिले. निवडणुकांमधील विजयानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला होता. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने होते. मात्र, शिवकुमार मुख्यमंत्रीपदाऐवजी काहीही स्वीकारण्यास तयार नव्हते.

१०० तास दिल्ली ते बंगळुरू बैठका

  • १३ मे रोजी निकाल जाहीर झाले आणि काँग्रेसला १३५ जागांवर विजय मिळाला.
  • १२ मे रोजी बंगळुरूत काँग्रेसच्या विधीमंडळ समितीची बैठक झाली. यामध्ये मल्लिकार्जून खर्गे मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतील असं ठरवण्यात आलं.
  • १५ मे रोजी पर्यवेक्षक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी खर्गेंकडे आपला अहवाल सोपवला.
  • यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावांवर चर्चा झाली पण सहमती झाली नाही.
  • १५ मे ला सिद्धरामय्या दिल्लीत पोहोचले, पण तब्येतीचं कारण देत शिवकुमार आले नाही.
  • १६ मे रोजी शिवकुमारही दिल्लीत आले. खर्गेच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी राहुल गांधीदेखील उपस्थित होते.
  • १७ मे चा दिवस महत्त्वाचा होता. यादरम्यान अनेक बैठका पार पडल्या.
  • सकाळी केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नंतर ११.३० वाजता सिद्धरामय्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. १२.३० वाजता राहुल गांधी आणि शिवकुमार यांची बैठक पार पडली.
  • १२ वाजता कर्नाटकचे काँग्रेसचे प्रभावी रणदीप सुरजेवाला यांनी १२ वाजता खर्गेंची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांना खर्गेंची भेट घेण्यास सांगितलं. त्यांच्यात २ तास चर्चा झाली. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाशिवाय आणखी कोणतंही पद घेण्यास तयार नव्हते.
  • काही आमदारांनीही खर्गेंची भेट घेतली. मंत्रिमंडळाबाबत त्यांनी भेट घेतल्याचं म्हटलं जातंय. 

 सोनिया गांधींचा हस्तक्षेप

कर्नाटकात मध्यरात्री उशिरा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटलं आहे. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले आहे. तर सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री असतील.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी