शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:35 IST

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला.

Karnataka Assembly Election 2023: १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले असून, पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक राज्याचे मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचारसभांचा धुरळा उडवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला. आताच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये सापावरून एकमेकांवर टीका-प्रत्युत्तर रंगताना दिसत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विषारी साप असल्याची टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आता प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल, अशी टीका करणारे आता माझी तुलना सापाशी करत जनतेकडून मते मागत आहेत. साप हे भगवान शंकराच्या गळ्याची शोभा आहे. माझ्यासाठी देशातील जनता हे देवाचे रूप आहे, शिवाचेच रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे. 

काँग्रेस आणि जेडीएस कर्नाटकातील विकासात मोठा अडथळा

एवढ्या मोठ्या संख्येने जनता सभांना उपस्थित राहत असल्याचे पाहून काँग्रेस आणि जेडीएसची झोप उडाली आहे. कर्नाटकाच्या विकासात काँग्रेस आणि जेडीएसचा मोठा अडथळा आहे. काँग्रेस आणि जेडीएस कितीही खेळ खेळू द्यात, पण कर्नाटकची जनता त्यांना क्लीन बोल्ड करून टाकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच कर्नाटकची ही निवडणूक केवळ आगामी पाच वर्षांसाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर ही निवडणूक येत्या २५ वर्षांच्या विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी आहे. एवढ्या मोठ्या व्हिजनवर अस्थिर सरकार कधीच काम करू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटकला भारतातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे, त्यामुळे येथे डबल इंजिनचे सरकार आवश्यक आहे. जोपर्यंत येथे काँग्रेस-जेडीएस युती राहिली, तोपर्यंत कर्नाटकच्या विकासाला ब्रेक लागला. जेव्हा येथे डबल इंजिनचे सरकार आले, तेव्हा येथील विकासाने नवी गती घेतली. काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांची कधीच पर्वा केली नाही, मात्र भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी बियाण्यापासून मार्केटपर्यंत काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा