शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समितीचे ५ शिलेदार भिडले-लढले; पण अखेर पदरी अपयश पडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 2:21 PM

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी पाहायला मिळाली, जिल्ह्यातील १८ मतदारसंघापैकी १३ मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे

महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून काही महिन्यांपूर्वीच हा वाद देशपातळीवर चर्चेत होता. मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील मराठीजनांनी संताप व्यक्त केला होता. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कर्नाटकच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं होतं. त्यामुळेच, यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत सीमा भागांत मराठी उमेदवार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची चर्चा होती. बेळगाव भागातील मराठी बांधवांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदा जिल्ह्यात ५ उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी पाहायला मिळाली, जिल्ह्यातील १८ मतदारसंघापैकी १३ मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर उर्वरीत मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. या १८ पैकी ५ मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर प्रचारसभाही घेतली होती. तर, आमदार रोहित पवार यांनीही एका मतदारसंघात समितीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र, प्रस्थापितांना शर्थीने लढा देणाऱ्या या पाचही उमेदवारांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर पाटील यांना ९५९३ मतं मिळाली आहेत. तर, येथील भाजपचे विठ्ठल हलगेकर ९०,७३६ मतांनी पहिल्या क्रमांकावर आघाडी घेऊन आहेत. 

बेळगाव दक्षिण मतदारसंघात रमाकांत कोंडूसकर आणि भाजप उमेदवारांत जोरदार लढत होती. मात्र, भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत, त्यांना ७७,०९४ मतांसह आघाडीवर असून कोंडुसकर यांना ६४,७८६ मतं मिळाली आहेत. 

बेळगाव उत्तर मतदारसंघातील समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना ६३८९ मतं असून येथे भाजप उमेदवार डॉ. रवि पाटील  मतांसह ४२४११ मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, काँग्रेसचे असिफ सेट हे ४६,७३० मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. 

बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेचे लक्ष्मी हेब्बाळकर १,०४,२२२ मतांसह प्रथम आघाडीवर आहेत. येथील समितीचे उमेदवार आर.एम. चौघुले यांना ४२,२३१ मत मिळाली आहेत. आहेत. 

यमकनमर्डी मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती नाईक यांना दुपारी १ वाजेपर्यंत १९६० मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सतिश झारकीहोली यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंतच्या झालेल्या फेऱ्यांत ९७,८६३ मतं घेतली आहेत. 

दरम्यान, यावरुन, बेळगाव जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभवाच्या छायेत असून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या उमेदवारांनी चांगल्याप्रकारे खिंड लढवली. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात मतं घेतली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगाव