शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर येडियुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, शांतता राखण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:05 IST

Karnataka CM Resigns : नुकताच येडियुरप्पा यांनी दिला होता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा. राजीनामा देताना ते झाले होते भावूक, अश्रूही झाले होते अनावर.

ठळक मुद्देनुकताच येडियुरप्पा यांनी दिला होता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा.राजीनामा देताना ते झाले होते भावूक, अश्रूही झाले होते अनावर.

कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकचेमुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणादेखील केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेल्या दिवशीच त्यांनी राजीनामा दिला. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात एका ३५ वर्षीय समर्थकानं आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला.

पोलिसांच्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं नाव रवि उर्फ रचप्पा असं असून ते कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावातील रहिवासी होते. ती व्यक्ती मजूर म्हणून काम करत होती, तसंच एका चहाच्या दुकानातही तो काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता. परंतु गावकऱ्यांनी असा दावा केला की तो येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता, परंतु त्यानं कर्जही घेतलं होतं.

परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं कर्ज घेतल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. तसंच त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर तो चिंतेत होता. तसंच त्यानं यानंतर स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर कदाचित त्यानं रात्री आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय या प्रकरणी कोणती अन्य बाजू आहे का याचा तपासही पोलीस करत आहेत. 

येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं दु:खया घटनेची माहिती मिळाल्या येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहनही केलं. त्यांनी याप्रकरणी एक ट्वीटही केलं. "प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चढउतार येत असता. परंतु कोणालाही त्यासाठी आपला बहुमूल्य जीव गमावण्याची गरज नाही," असं ते म्हणाले.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस