शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटक निकालांमुळे आर्थिक चिंता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

आश्वासनांची पूर्ती करताना दमछाक : ग्रामीण भागांवर लक्ष द्यावे लागणार

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मोदी सरकारसमोर २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे मोठे आव्हान असून, त्यासाठी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना आर्थिक गाडा रूळांवरून सरकण्याची भीती आहे. ग्रामीण भारतावर अधिक खर्च करताना वित्तीय तूट फुगण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे.भारताच्या ग्रामीण भागात ६८ टक्के लोकसंख्या राहते. मतदारांचा हा सर्वांत मोठा घटक आहे. २0२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. पण त्यावर काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मोदी यांना काँग्रेसकडून मोठे आव्हान मिळत असल्याचे कर्नाटक आणि गुजरात निवडणुकीत दिसून आले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या आधीपासूनच अर्थसंकल्पावर ताण होता. २0१८ वित्त वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सरकारला पाळता आले नाही. या वर्षासाठीचे उद्दिष्ट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के करण्यात आले आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. या वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घसरला आहे. महागाईत वाढ होत आहे. भारताचे आर्थिक परिदृश्य काळवंडले आहे. या सर्वांचा ताण अर्थसंकल्पावर पडेल. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज’चे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुवोदीप रक्षित यांनी सांगितले की, कर्नाटक निवडणुका अर्थव्यवस्थेसाठी अनिश्चिततेचा अतिरिक्त स्रोत बनल्या आहेत. तसेही निवडणुकीपूर्वीच्या वर्षात वित्तीय घसरणीची जोखीम असतेच. कच्च्या तेलाच्या किमतींनी चित्र अधिक बिकट केले आहे. यंदा वित्तीय तूट ३.५ टक्के राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे वित्तीय तूट वाढेल‘एचएसबीसी होल्डिंग पीएलसी’च्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, निवडणुकीच्या दबावामुळे सरकार पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढविण्याऐवजी उत्पादन शुल्कात कपात करेल. त्यामुळे वित्तीय तूट वाढेल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १0 डॉलरने वाढल्यास भारताची वित्तीय तूट 0.३ टक्क्यांनी वाढेल.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८