शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

काश्मीरसंबंधीचा निर्णय घटनापीठाकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 5:11 AM

आॅक्टोबरमध्ये सुनावणी; घटनात्मक वैधता तपासणार

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करणे व त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ तपासून पाहणार आहे. ही सुनावणी बहुधा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिघळू नये यासाठी तेथे नागरिकांच्या हिंडण्या-फिरण्यावर तसेच इंटरनेटसह अन्य दूरसंचार सेवांवर जे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्याविषयीही न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस जारी केली असून, सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सरकारच्या या दोन्ही निर्णयांना आव्हान देणाऱ्या डझनभर याचिका दाखल होऊन दोन आठवडे उलटले तरी सरन्यायाधीशांसह पाच वरिष्ठ न्यायाधीश अयोध्या सुनावणीत व्यस्त असल्याने त्या सुनावणीस येऊ शकल्या नव्हत्या.बुधवारी सकाळी अयोध्येची सुनावणी सुरू करण्याआधी त्यापैकी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एस. अब्दुल नझीर या तिघांचे एक विशेष खंडपीठ स्वतंत्रपणे बसले व त्यांनी काश्मीरशी संबंधित सर्व याचिकाऐकल्या.विशेष दर्जा रद्द करणे व राज्याचे विभाजन यासंबंधीच्या याचिका घटनापीठाकडे पाठविल्या जातील, असे सरन्यायाधीशांनी अल्प सुनावणीनंतर स्पष्ट केले. निर्बंधासंबंधीच्या याचिकांवर याआधी न्यायालयाने परिस्थिती सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहणे पसंत केले होते. मात्र, आता वाट न पाहता तोही विषय हाती घेण्याचे ठरविले.कर्तव्ये पार पाडावीच लागतीलकेंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता दोघेही हजर होते. आम्ही उपस्थित आहोत, तेव्हा औपचारिक नोटिसा काढण्याची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे होते, तसेच हा विषय अत्यंत संवेदनशील असून, त्याचे पडसाद सीमेपलीकडेही उमटू शकतात.शिवाय येथे जे काही होईल ते संयुक्त राष्ट्रसंघापर्यंतही पोहोचविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनीच भाष्य करताना जरा जपून करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; परंतु ‘आमचे कर्तव्य आम्हाला पार पाडावेच लागेल’, असे सरन्यायाधीश त्यांना म्हणाले.