शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 18:40 IST

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.  काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादच्या जंगलात लष्कर आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये आज चकमक उडाली होती. दरम्यान ही चकमक अद्याप सुरू असून, अजून एक दहशतवादी लपून बसलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रफियाबादच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. तसेच शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने बेछुट गोळीबार करण्यास सुरुवात केली. लष्कराकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यात चार दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर बारामुल्ला- उरी रोडवर एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे.  

दरम्यान, पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी मंगळवारी हाणून पाडला होता. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले होते, या मोहीमेदरम्यान मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.

 

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेंJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान