शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळली! खुलेआम फिरताहेत दहशतवादी

By admin | Published: April 18, 2017 12:06 PM

जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून, पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण दिवसेंदिवस स्फोटक होत चालले असून,  पोटनिवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झालेले काश्मिरी युवक शस्त्रास्त्रांसह काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर खुलेआम फिरत आहे. या तरुणांना राज्यशासनावर विश्वास राहिला नसून, लष्करासाठीही हे तरुण डोकेदुखी ठरत आहेत. त्यांना स्थानिकांचा पाठिंबा असल्याने लष्करालाही त्यांच्याविरोधात कारवाई करताना सावधगिरी बाळगावी लागत आहे.
यासंदर्भातील वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. काश्मीरमधील शोपियाँ, कुलगाम, पुलवामा आणि अवंतीपोरामध्ये हे दहशतवादी रस्त्यांवरून बंदुका शस्त्रास्त्रे घेऊन भटकत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित वृत्तपत्राने आपल्याकडे यासंदर्भातील छायाचित्रे आणि व्हिडिओ असल्याचा दावाही केला आहे. यामध्ये बरेच काश्मिरी तरुण एके-47  आणि रायफल्स घेऊन एका बागेमध्ये जमल्याचे दिसत आहे. 
गेल्या वर्षी 8 जुलै रोजी लष्कराने बुऱ्हाण वानी या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. तसेच अनेक तरुणांनी दहशतवादाची वाट धरली होती. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युवा दहशतवादी लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले आहेत. बुऱ्हाण वाणीला ठार मारण्यात आल्यापासून सुमारे 200 हून अधिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये दाखल झाले आहेत.  दक्षिण काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांना बऱ्यापैकी समर्थन मिळत आहे. स्थानिकांकडून त्यांना आसरा आणि अन्नपाणी मिळत आहे. दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्यास त्याठिकाणी दगडफेक आणि आंदोलन केले जात आहे. 
अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही अशीच माहिती दिली आहे.  दक्षिण काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक असून, कारवाईची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. 90 च्या दशकाशी तुलना केली असता स्थानिकांची दहशतवादाबाबतची धारणा बदलली आहे. दहशतवादी आणि हुर्रियतचे नेते स्थानिकांना भरकटवत आहेत.  तसेच सोशल मीडियाही अशा तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.