शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

काश्मीरचा मुद्दा लष्कराच्या मार्गानं सुटणार नाही- बिलावल भुत्तो

By admin | Published: October 05, 2016 8:01 PM

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे, असं वक्तव्य केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांचे पुत्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती स्वीकारली पाहिजे. तसेच काश्मीरचा मुद्दा हा लष्कराच्या मार्गानं न सुटता शांततेच्या मार्गानं सुटू शकतो, असंही टि्वटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे काश्मीर पाकिस्तानचं आहे, असं म्हणणा-या बेनझीर भुत्तो यांच्या पुत्रानेच भारत आणि पाकिस्ताननं युद्धाची भूमिका टाळून शांती नांदावी, अशी भूमिका घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भुत्तो परिवाराचा पाकिस्तानच्या राजकारणावर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे बिलावल भुत्तो यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.  दोन्ही देशांनी सर्वसामान्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारा युद्धाचा विचार त्यागला पाहिजे, असं आवाहन बिलावल भुत्तो यांनी केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी नवाज शरीफ यांनी बोलावलेल्या बैठकीलाही बिलावल भुत्तो उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिलावल भुत्तो यांनी नवाज शरीफांवरही टीका केली आहे. काश्मीरचा मुद्दावर लष्कराच्या मार्गानं तोडगा निघणार नसून, शांततेच्या मार्गानं तो प्रश्न सुटू शकतो, असं उपरोधिक टीका नवाज शरीफांवर केली आहे.