शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काश्मीर खो-यात आज शाळा-कॉलेज बंद

By admin | Published: April 18, 2017 9:17 AM

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात वाढणा-या अंशाततेमुळे प्रशासनाने मंगळवारी येथील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात हिंसाचार वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथील एका कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या पोलीस कारवाईला विरोध करणा-या विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास 60 हून अधिक शाळा तसेच कॉलेजचे विद्यार्थी जखमी झाले, जखमींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश आहे.    
 
दोन दिवसांपासून वारंवार होणा-या या घटनांच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारनं मंगळवारी खो-यातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलमावा येथे ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गन आणि अश्रुधुराचा वापर केला होता.  
 
पुलवामा येथील गर्व्हमेंट कॉलेजमधील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी कुपवाडा ते सोपोर आणि श्रीनगर ते कुलगामपर्यंत आंदोलन केले. मिळालेल्या  माहितीनुसार, काश्मीर युनिर्व्हसिटी स्टुडन्ट्स युनियन (KUSU)नं सोमवारी आंदोलन छेडले होते. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. 
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील मंगळवारी सर्व शाळा, कॉलेज आणि युनिर्व्हसिटी  बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री अल्ताफ बुखारी यांनी दिली. 
 
दरम्यान, पुलवामा कारवाईचा निषेध नोंदवत श्रीनगर येथे शेकडो आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची तसेच भारताविरोधी नारेबाजी करत मुख्य एम.ए.रोड बंद केला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यात 7 विद्यार्थी आणि एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आम्ही शांततापूर्ण मार्गानंच आंदोलन करत असल्याचा दावा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. 
काय आहे नेमकी घटना?
शनिवारी दक्षिणी काश्मीर येथील पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत 50 विद्यार्थी जखमी झाले होते. यावर शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल हमीद शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पोलिसांनी शाळेच्या आत न येण्याची विनंती केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.  
 
यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आणि सुरक्षा रक्षकांकडून अश्रुधुराचा वापर करत कारवाई करण्यात आली. ज्यात विद्यार्थी जखमी झाले.  
 
तर दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, शाळेपासून 200 मीटर अंतरावर नाका बंद ठेवला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली.