शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

काश्मिरी पंडित पलायनाच्या मार्गावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 4:18 AM

काश्मीर खोऱ्यातील दगडफेक व हिंसाचारामुळे खोऱ्यातील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतीसाठी देशाच्या राजधानीत मोहीम

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली काश्मीर खोऱ्यातील दगडफेक व हिंसाचारामुळे खोऱ्यातील उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा धोका निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतीसाठी देशाच्या राजधानीत मोहीम चालू असताना खोऱ्यातील पंडित मात्र घाबरून पलायनाच्या तयारीत आहेत. हिंसाचारामुळे काश्मिरी पंडितांना चिंतेने पछाडले आहे. दिल्लीत अ.भा. काश्मिरी पंडित समुदायाचे उपाध्यक्ष एम.एल. भल्ला यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली. यापाठोपाठ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. काश्मिरी पंडित कुटुंबांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रयत्न चालवले आहेत.पंतप्रधानांचे आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. परदेशातून येताच त्यांनी मंगळवारी सकाळी गृहमंत्री राजनाथसिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.पर्यटकांची अक्षरश: लूटश्रीनगर व काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराचा पुरेपूर गैरवाजवी लाभ प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअरलाइन्स व ट्रॅव्हल कंपन्यांनी उठवला आहे. हिंसाचारात अथवा संकटात अडकलेले पर्यटक तसेच अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या अडचणीचा पुरेपूर फायदा उठवीत, त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत.