शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

काटजू, हाजीर हो..!

By admin | Published: October 18, 2016 6:12 AM

केरळमधील सौम्या या मुलीच्या खुनाबद्दल आरोपीला निर्दोष ठरविणाऱ्या आपल्या निकालावर निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी समाजमाध्यमांतून केलेल्या जहरी टीकेची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली

नवी दिल्ली : केरळमधील सौम्या या मुलीच्या खुनाबद्दल आरोपीला निर्दोष ठरविणाऱ्या आपल्या निकालावर निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी समाजमाध्यमांतून केलेल्या जहरी टीकेची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली आणि काटजू यांनी ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयापुढे स्वत: हजर होऊन हा निकाल कसा चुकीचा आहे, हे पटवून द्यावे, असे फर्मान सोडले. आपल्याच एका माजी न्यायाधीशाविरुद्ध ‘हाजीर हो’ असा पुकारा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.न्या. काटजू यांनी १७ सप्टेंबर रोजी एक ब्लॉग लिहून या निकालात मूलभूत दोष आहे व कायद्याच्या विद्यार्थ्यांना कळतो तेवढाही कायदा न्यायाधीशांना कळत नाही, अशी टिका केली होती. या निकालाविरुद्ध केरळ सरकार आणि मयत सौम्याच्या आईने फेरविचार याचिका केल्या आहेत. त्या सोमवारी सुनावणीसाठी आल्या तेव्हा न्या. रंजन गोगोई, न्या. पी. सी. पंत व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने काटजू यांच्या या ब्लॉगची दखल घेतली आणि काटजू यांनी अशा प्रकारे कोर्टाबाहेर मते मांडण्याऐवजी न्यायालयापुढे उभे राहून कायद्याच्या मुद्द्यांवर कोण बरोबर व कोण चूक, याचा वादविवाद करावा, असा आदेश दिला.>काय लिहिले होते ब्लॉगमध्येनिकालातील या निष्कर्षावर टिका करताना काटजू यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते की, ऐकिव माहितीवर विश्वास ठेवून काढलेला हा निष्कर्ष आहे.ऐकिव माहिती हा न्यायालयात ग्राह्य पुरावा होत नाही, हे कायद्याच्या विद्यार्थ्यालाही कळते. परंतु आयुष्याची अनेक दशके कायद्याच्या क्षेत्रात घालविलेल्या विद्वान न्यायाधीशांनी दंड प्रक्रिया संहितेचे कलम ३०० वाचले नसावे, असे वाटते.