शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसशी सहमतीसाठी केसीआर अनुकूल? पडद्याआडून हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:34 IST

निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत.

नवी दिल्ली : निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत. त्यांनी तशा हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येते.तेलंगणात मतदान झाल्यानंतर केसीआर यांनी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची भेट घेऊन निवडणुकीनंतर निर्माण होऊ शकणाऱ्या स्थितीवर चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले. लोकसभा निवडणुकांत या दोन पक्षांची आघाडी नसली तरी निवडणुकांनंतर परिस्थिती पालटू शकते, असे सूचक विधान तेलंगणा राष्ट्र समितीच्या सूत्रांनी केले आहे.भाजप व काँग्रेसला दूर ठेवून लोकसभा निवडणुका निकालानंतर प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पण आता ते काँग्रेसशीही सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र त्यांनी अद्याप तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला. पण तेलंगणा राष्ट्र समितीने त्यापासून दूर राहिली होती.जगनमोहनशी संपर्कआपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केल्यानंतर त्यांचे राजकीय शत्रू केसीआर काहीसे सुखावले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले. नायडूंचे विरोधक असलेल्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्याशीही केसीआर यांनी संधान बांधले आहे.

टॅग्स :marathiमराठीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक