शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"केसीआरच तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील"; औवेसींनी MIM चेही भविष्य सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:48 IST

तेलंगणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.

हैदराबाद - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने दक्षिण भारतातील तेलंगणावरही यंदा फोकस केलं आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर, एमआयएमनेही ९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र, केसीआर हेच तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत असदुद्दीन ओवैसींनी केले आहे. तसेच, एमआयएमच्या उमेदवारांचं काय होणार, हेही त्यांनी सांगितलं. 

तेलंगणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास राज्यातील महिलांना दरमहा ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सामाजिक पेन्शन, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात आणि मोफत बस प्रवास यांसारख्या सुविधांमध्ये हा लाभ महिलांना मिळेल, अशीही घोषणा राहुल गांधींनी केली. 

तेलंगणात केसीआर म्हणजेच चंद्रशेखर राव हेच मुख्यमंत्री होतील, असे AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्यांदा भाकीत केलं आहे. तेलंगणात जनतेच्या आशिर्वादाने एमआयएमचे ९ उमेदवार विजयी होणार आहेत. मला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता केसीआर यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करेल. पंतप्रधान मोदी फक्त एकच म्हणतील की, स्टेअरींग ओवैसींच्या हातात आहे. तर, राहुल गांधी म्हणतील की, ओवैसी ही भाजपाची बी टीम आहे. हे दोन्ही नेत्यांचे पेटंट डायलॉग आहेत आणि २८ नोव्हेंबरपर्यंत ते फक्त एवढेच सांगतील, असे म्हणत काँग्रेस आणि भाजपावरही ओवैसींनी निशाणा साधला.

वायएसआर तेलंगणाचा काँग्रेसला पाठिंबा

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची 'भ्रष्ट आणि लोकविरोधी राजवट' संपवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शर्मिला म्हणाल्या की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असताना सरकारविरोधी मतांचे विभाजन करून अडसर बनायचे नाही. तसेच, काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला यांनी तेलंगणातील जनतेला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनChief Ministerमुख्यमंत्री