शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:03 IST

नीलाकुरूंजी पर्यटकांच्या प्रतीक्षेत; केरळ पर्यटन विभागाची माहिती

मुंबई : महाप्रलयानंतर उद्ध्वस्त झालेले केरळ पुन्हा एकदा उभे राहिल्याची माहिती केरळपर्यटन विभागाने शनिवारी दिली आहे. केरळ प्रशासनाने तातडीने यासंदर्भात दुरुस्तीची कामे हाती घेत रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडविल्या असून, पर्यटकांसाठी केरळ सज्ज असल्याचा दावाही केरळ पर्यटन विभागाने केला आहे. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात पर्यटन विभागाकडून पर्यटकांमध्ये सद्य:स्थितीबाबत जनजागृती केली जात आहे. पर्यटकांना या मेळाव्यात मोफत प्रवेश दिला जाणार असून रविवारी, ७ ऑक्टोबरला मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.महाप्रलयामुळे रस्त्यांसह वीज आणि पाण्याची मोठी समस्या केरळमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने तातडीची पावले उचलत या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही. येथील जनजीवन सुरळीत झाले असून पर्यटकांनी मोठ्या संख्येने केरळला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. केरळमधील आकर्षणांबाबत माहिती देण्यासाठी केरळ पर्यटन विभागातर्फे या मेळाव्यात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.केरळसोबत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील राज्य शासनाच्या पर्यटन विभागांनीही आपापल्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी मेळाव्यात भाग घेतला आहे. केरळसह देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.नीलाकुरूंजी उत्सवाचे आयोजनतब्बल १२ वर्षांतून एकदाच फुलणाºया ‘नीलाकुरींजी’ यांचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही फुले पूर्णपणे फुलतात. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलांना पाहण्यासाठी रोज सरासरी ४ ते ५ हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या ऐतिहासिक उत्सवासाठी वन विभागाकडून दर १२ वर्षांतून एकदा विशेष परवानगी दिली जाते. याआधी हा उत्सव २००६ साली झाला होता. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन