शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:06 IST

Loksabha Election 2024: रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीनं अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ महारॅलीचं आयोजन केले. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्ष सीपीआय(M) ने केजरीवालांच्या अटकेसाठी काँग्रेसला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

कोझिकोड - Pinarayi Vijayan on Rahul Gandhi ( Marathi News ) दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनिषेधार्थ इंडिया आघाडीनं रामलीला मैदानात लोकशाही बचाओ महारॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडूनअरविंद केजरीवालांवर आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनेच दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला. विशेष म्हणजे दिल्लीच्या महारॅलीत राहुल गांधी यांच्यासोबत सीपीआय(M) चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी होते. 

मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयचा उमेदवार मैदानात आहे. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पण वायनाडमध्ये ते कोणाविरोधात लढाई लढतायेत हे पाहा. त्याठिकाणी सीपीआयचे एनी राजाविरोधात राहुल गांधी उभे आहेत. काँग्रेस आणि सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. मात्र ते भाजपाशी लढण्याऐवजी सीपीआयच्या उमेदवाराला आव्हान देत आहेत असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, वायनाडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपाने खेळी खेळली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बीडीजेएसने एकत्रित निवडणूक लढली होती. त्यावेळी तुषार वेल्लापल्ली त्यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना जवळपास ७८ हजार मते मिळाली होती जी ७.२५ टक्के होती. तर राहुल गांधींना ४ लाख ३१ हजाराहून अधिक मतदान झाले होते. मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी ही जागा जिंकली. 

राहुल गांधींनी साधला होता भाजपावर निशाणा

रविवारी दिल्लीत झालेल्या महारॅलीत राहुल गांधींनी भाजपावर आरोप केला होता. पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सारा देश आणि भाजपाचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल