शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

केरळ :मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाह समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 04:31 IST

केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला.

केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला.हा अभूतपूर्व विवाह समारंभ गावातील जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार मोठ्या आनंदात पार पडला.वधु अंजूचे वडिल अशोक कुमार (४९) यांचे अचानक निधन झाले. मुलीचे लग्न कसं करायचं? याची चिंता अंजुच्या आईला लागली होती. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. अंजुचे वडील अशोक कुमार आणि जमातचे सचिव नजमुद्दीन यांची मैत्री होती. अंजुच्या आईने नजमुद्दीन यांना मदतीसाठी विनंती केली. त्यांनीही कुठलीही सबब पुढे न करता तयारी दाखविली आणि मशिद समितीपुढे अंजुचे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. समितीनेही सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टीने संमती दिली आणि अंजुचा विवाह समारंभ मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार पूजा, हवन आदी मंगलविधिसह पार पडला.शरत शशि आणि अंजु या नवदाम्पत्यांना शुभार्शीवाद देण्यासाठी आलेल्या ४ हजार पाहुण्यांना शाकाहारी भोजनाची पंगतही देण्यात आली. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वधु-वराने मशिदीचे इमाम रियासुद्दीन फैजी यांचे आशीर्वाद घेतले. चेरावल्ली मुस्लिम जमात कमिटीने वधु-वराला सोन्याची दहा नाणे, दोन लाख रुपये रोख, तसेच टीव्ही, फ्रीज आणि फर्निचरसह संसारोपयोगी वस्तू भेट म्हणूनदिल्या.असे विवाह किंवा समारंभ मंदीर, चर्च, गुरुद्वारात का होऊ शकत नाहीत? ही सर्व धार्मिक ठिकाणे सर्वांसाठी खुले का होत नाहीत? एक-दुसऱ्याच्या रितीरिवांजांचा आदर का करीत नाही? दुर्दैवाने धर्माच्या नावावर शतकांपासून संकुचित राजकारण केले जात आहे. धर्माच्या नावाने काही लोक समाजात तेढ निर्माण करीत आहेत. आपसांत लढवून एक-दुसºयाला कमी लेखतात, असे चित्र असतांना मशिदीत हिंदु जोडप्याचा विवाह लावून मल्याळी मुस्लिम समुदायाने आम्ही भारतीय असल्याचे दाखवून दिले.- डॉ. वेदप्रताप वैदिकया अद्वितीय विवाह सोहळ्यातून मल्याळी मुस्लिम समाज किती महान, मोठ्या मनाचा आणि किती मानवतावादी आहे, हे सिद्ध केले. सोबतच मानवता आणि एकतेचा संदेशही दिला.

 

टॅग्स :marriageलग्नKeralaकेरळ