शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:27 AM

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपायांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यांत कठोरपणे पालन करून घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना गुरुवारी दिले. कोविड-१९ ची दुसरी लाट अजून विरलेली नाही आणि प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्राने म्हटले.देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत १० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. एवढेच काय महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटली असून तेथे उपचाराधीन रुग्ण १६ टक्के, कर्नाटकमध्ये ५.५८, तमिळनाडूत ५.५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४.२१ टक्के आहेत.  देशात गुरुवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ४६,१६४ नोंदली गेली. त्यात केरळचा वाटा मोठा आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. कोणत्याही परिस्थितीत सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जास्तीची काळजी घ्या, उपाय योजा, अशा शब्दांत केंद्र सरकारने राज्यांना सावध केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी उपाययोजना केली आहे का, असे विचारल्यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे.”

बहुसंख्य भारतीयांना लसींनंतर दुष्परिणाम नाहीत : पाहणीचा निष्कर्षn    देशात ६० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस दिली गेली असून त्यातील बहुसंख्य जणांना त्यानंतर कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) जाणवला नाही किंवा जाणवला असेल तर तो अगदी सौम्य होता. n    यावर्षी १६ जानेवारीपासून देशभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांच्या अनुभवांची पाहणी करून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. n    सौम्य दुष्परिणाम जाणवले ते कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा टोचून घेतल्यानंतरच्या २४-४८ तासांत आणि फक्त एक टक्का लोकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर कोविड-१९ ची बाधा झाली. या तक्रारी होत्या थकवा, हात दुखणे आणि ताप येण्याच्या. कोव्हॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ३० टक्के जणांना ताप आला तर एक टक्के लोकांना तापाशिवाय गंभीर तक्रार होती.

n    ही पाहणी ‘लोकल सर्कल्स’ या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केली. त्यात कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ७० टक्के जणांना आणि कोविशिल्डची दुसरीही मात्रा घेतलेल्यांपैकी ७५ टक्के जणांना कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.n    कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ६४ टक्के जणांना आणि याच लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी ७८ टक्के जणांना अजिबात दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्या