शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लग्नासाठी काय पण! केरळच्या मुसळधार पावसात जोडपं अडकलं; टोपात बसून मंडपात पोहचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:41 IST

Kerala rains flood bride and groom use cauldron : केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केरळमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पावसामुळे-पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची टीम मदत कार्यात गुंतलेली आहेत. तिरुअनंतपुरम, कोल्लमसह 7 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तर, पथानामथिट्टासह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान एका हटके लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेच लग्नमंडपात जाणं अवघड झालं होतं. अशा वेळी या जोडप्याने एक अनोखी शक्कल लढवली आणि टोपाचा उपयोग करून मंडप गाठला. याचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

अनेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कुट्टनाड भागात राहणाऱ्या राहुल आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वीच ठरला होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणं देण्यात आलं होतं आणि कोरोनाचे नियम पाळत लग्न करण्याचं नियोजन झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अऩेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली गेले. लग्नाच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. 

पुराच्या पाण्यात टोपातून लग्नमंडपात पोहोचले

रस्त्यावर कमरेएवढं पाणी होतं. त्यामुळे कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. अशावेळी जोडप्याने आजच लग्न करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी शक्कल लढवली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा एक मोठा टोप घेतला. त्यात दोघंही बसले आणि पुराच्या पाण्यात पातेल्यातून लग्नमंडपात पोहोचले. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल