शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 02:19 IST

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळच्या पूरग्रस्त भागातील शिबिरातील स्थलांतरित लोक आता घरी परतू लागले आहेत. तथापि, भूस्खलन आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यात अनेक मृतदेह आढळून आले आहेत. राज्यातील मृतांची संख्या शनिवारी ११३ वर पोहोचली आहे.

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक घटना झाल्या होत्या. या ठिकाणी आता सर्च आॅपरेशन सुरू आहे. हैदराबादेतील एक विशेष टीम कवलप्परा येथे जीपीआरसह दाखल होत आहे. या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दडलेल्या मृतदेहांचा शोध लावता येणार आहे. मलप्पुरममध्ये २१, वायनाडमध्ये ७ आणि कोट्टायममध्ये १ जण बेपत्ता आहे. पाऊस आणि पुरामुळे १२,७६१ घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ११८६ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ८०५ शिबिरात १,२९,५१७ लोक राहत आहेत.हिमाचलमध्ये ६ लोकांना वाचविलेसिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाने कहर केला असून, पालमपूरमध्ये पुरामुळे फसलेल्या ६ जणांना वाचविण्यात आले आहे. कांगडामध्ये सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत, तर कांगडा आणि चम्बा जिल्ह्यात भूस्खलनानंतर अनेक रस्ते अद्याप बंद आहेत. आगामी दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे.मध्यप्रदेशात पावसाचे आतापर्यंत ७० बळीभोपाळ : पश्चिमी मध्यप्रदेशच्या काही भागांत सततच्या पावसाने पूर कायम आहे. पूर आणि संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, राज्याच्या इतर भागांत शुक्रवारपासून पाऊस कमी झाला आहे. महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिव जी. व्ही. रश्मी यांनी सांगितले की, ७० पैकी १५ जणांचा मृत्यू वीज कोसळून झाला आहे.येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इंदिरा सागरसह सहा मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत ११७ लोकांना वाचविण्यात आले आहे. पुरामुळे ४२९८ लोक विस्थापित झाले आहेत, तर २३६८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.कोलकात्यात मुसळधार पावसाचा इशाराकोलकाता : पश्चिम बंगालसह अन्य राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात काही भागांत वीज कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.राजस्थानात जनजीवन विस्कळीतजयपूर : राजस्थानात गत काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्त कोटा आणि आजूबाजूच्या भागांत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये शुक्रवार ते शनिवारी सकाळपर्यंत १३७ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर