शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दारू अन् लॉटरीच्या भरवशावर चालतंय भारतातील हे राज्य, येथे आतापर्यंत एकदाही आलं नाही भाजप सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:54 IST

याथे भाजपचा उल्लेख एवढ्यासाठी केला जात आहे, कारण गुजरातमध्ये दीर्घ काळापासून भाजपचे सरकार आहे आणि तेथे दारूवर पूर्णपणे बंदी आहे. एढेच नाही तर, गुजरात एक 'ड्राई स्टेट' म्हणूनही ओळखले जाते...

उत्तर प्रदेश सरकारच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा शेतीतून येतो. तर गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्र, हे उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत, जे या राज्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 40 ते 45% आहेत. याचप्रमाणे इतर राज्यांचेही उत्पन्नाचे आपापले स्त्रोत आहेत. दरम्यान, केरळमध्ये जवळपास 25 टक्के महसूल हा केवळ दारू आणि लॉटरीच्या विक्रीतून मिळत असल्याचे वृत्त आहे. मात्र, हा केरळच्या महसूलाचा सर्वात मोठा स्रोत नाही. केरळच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत रेमिटन्स आहे, ज्यातून राज्याला 30 टक्के एवढा महसूल प्राप्त होतो. रेमिटन्स म्हणजे, येथील लोक कामासाठी परदेशात जातात आणि पैसे राज्यात पाठवतात. मात्र रेमिटन्स बाजूला काढले, तर राज्याला एकूण महसुलाच्या एक चतुर्थांश महसूल केवळ मद्य आणि लॉटरी विक्रीतून मिळतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमध्ये मद्य आणि लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीने 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याचे दोन मुख्य महसूल स्त्रोत म्हणून एकूण 31,618.12 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. जे एकूण उत्पन्नाच्या जवळजवळ एक-चतुर्थांश एवढे आहे. मद्यविक्रीतून मिळालेला महसूल 19,088.86 कोटी रुपये होता तर लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीतून मिळालेला महसूल 12,529.26 कोटी रुपये एवढा होता. ही आकडेवारी मिळून राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या 25.4% आहे. अर्थात, केरळचे काम दारू आणि लॉटरीबाजांनी खर्च केलेल्या पैशांवर चालते, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये.

महत्वाचे म्हणजे, भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये आतापर्यंत एकदाही आपले सरकार स्थापन करता आलेले नाही. याथे भाजपचा उल्लेख एवढ्यासाठी केला जात आहे, कारण गुजरातमध्ये दीर्घ काळापासून भाजपचे सरकार आहे आणि तेथे दारूवर पूर्णपणे बंदी आहे. एढेच नाही तर, गुजरात एक 'ड्राई स्टेट' म्हणूनही ओळखले जाते. याउलट, केरलमध्ये दारूची जबरदस्त विक्री होते. खरे तर, येथे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 19,088.68 कोटी रुपयांची दारू विकली गेली. हा आकडा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 18,510.98 कोटी होता. ही आकडेवारी दारूच्या विक्रीचे राज्याच्या रेव्हेन्यूमधील योगदान दर्शवणारी आहे.

लॉटरीच्या तिकिटांतून येणारा महसूलही राज्याच्या रेव्हेन्यूमध्ये महत्वाचे योगदान देतो. मात्र, अनक्लेम्ड लॉटरी बक्षिसांसंदर्भात, या स्रोतातून किती रेव्हेन्यू जनरेट झाला, हे सरकार स्पष्ट करू शकत नाही. केंद्रीय लॉटरी अधिनियम 2010 नुसार, ज्या लॉटरीमधून बक्षिसे जिंकली जातात परंतु दावा केला जात नाही, अशा लॉटरींमधून मिळालेल्या पैशांचे रेकॉर्ड तयार करणे किंवा ठेवण्याची सरकारला आवश्यकता नाही. या कारणास्तव, दावा न केलेल्या बक्षिसांमधून जमलेली रक्कम अज्ञात राहते. 

टॅग्स :KeralaकेरळBJPभाजपाState Governmentराज्य सरकार