शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शाळकरी मुलीने वर्षभरापूर्वीच लिहिली होती लघुकथा; वायनाडमध्ये अगदी तसंच घडलं, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:21 IST

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

Kerala Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनाने ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वायनाडमध्ये अजूनही मदतकार्य सुरू आहे. बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  देशभरातून या घटनेवरुन चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता वेगवेगळी माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. वायनाड मधील भूस्खलन झालेल्या घटनेसारखीच एक लघुकथा एका लहान मुलीने लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीने लिहिलेली कथा एका मॅगझिनमध्ये छापुनही आली होती. ही लहान मुलगी इयत्ता आठवीत शिकते. तिने लिहिलेली कथा आता खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे. 

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

नेमकं प्रकरण काय?

या मुलीचे नाव लाया असं आहे. ती इयत्ता आठवीत शिकते. गेल्या वर्षी तिने शाळेत एका लघुकथा लिहिली होती, तिने ही कथा तिच्या एवढ्याच मुलीची लिहिली होती. लायाची ही कथा गेल्या वर्षी स्कूल मॅगझिनमध्येही प्रसिद्ध झाली होती. लायाने लिहिलेली कथा धबधब्यात बुडणाऱ्या मुलीची होती. तिचा बुडून मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर ती पक्ष्याच्या रूपाने गावात परतते. लायाच्या कथेत पक्षी गावातील मुलांना म्हणते, 'मुलांनो, या गावातून पळून जा. इथे मोठा धोका होणार आहे.' यानंतर मुलं गाव सोडून पळू लागतात. त्यांनी मागे वळून पाहिले तर डोंगरावरुन जोरात पावसाचे पाणी वाहते. कथेत यानंतर पक्ष्याचे रूपांतर एका सुंदर मुलीत होते, आणि काही क्षणातच ती गायबही होते.

वायनाडमधील चुरमला भूस्खलनाच्या विळख्यात बुडाले आहे. लायाच्या कथेपेक्षा वेगळे, येथील वातावरण अतिशय वेदनादायक आहे. लायाने तिचे वडील लेनिन यांनाही गमावले आहे. लायाच्या शाळेतील ४९७ विद्यार्थ्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे वडील आणि भावंडही गमावले आहेत. शाळेचीही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शाळेच्या मैदानाचे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्तराखंडमध्येही पावसामुळे मोठं नुकसान

दिल्लीसह देशातील अनेक शहरांत पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने देशातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. काल (३१ जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल आणि केरळच्या वायनाडमध्येही भूस्खलन झालं आहे. 

टॅग्स :wayanad-pcवायनाडmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस