शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सुखाच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोईचा हात? फेसबुक पोस्टबाबत साबरमती तुरुंग अधिकाऱ्यांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 09:08 IST

सुखा हा मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रहिवासी असून तो 2017 मध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कॅनडाला पळून गेला होता.

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनीके याची कॅनडातील विनिपेग येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट लिहून सुखाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. याबाबत साबरमती सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई किंवा त्याच्या टोळीचा या हत्येची जबाबदारी असलेल्या फेसबुक पोस्टशी कोणताही संबंध नाही. 

सुखा हा मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रहिवासी असून तो 2017 मध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कॅनडाला पळून गेला होता. तो दविंदर बंबीहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बंबीहा गँग यांच्यात नेहमी गँगवॉर होताना दिसते. दरम्यान, साबरमती तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, "गुरुवारी समोर आलेल्या फेसबुक पोस्टचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी काही संबंध नाही. जी कॅनडात झालेल्या सुखा दुनीकेच्या हत्येशी संबंधीत होती." 

लॉरेन्स बिश्नोईला ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला साबरमती सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची दिल्लीतील तिहार तुरुंगातून साबरमती सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सुखाच्या हत्येनंतर, पंजाबच्या बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरियाच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांनी हत्येची जबाबदारी स्वीकारण्यासाठी फेसबुकवर वेगवेगळ्या पोस्ट केल्या.

साबरमती सेंट्रल जेलच्या अधीक्षक श्वेता श्रीमाळी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "लॉरेन्स बिश्नोई जेलमधून पोस्ट केली नसणार, कारण त्याच्या नावावर अनेक बनावट सोशल मीडिया अकाऊंट सुरू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती पोस्ट दुसऱ्याने केली असण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की, ती त्याने पोस्ट केलेली नाही किंवा त्याने ती पोस्ट करण्यास संमती दिली नाही."

लॉरेन्स बिश्नोईला कोणी भेटायला आले नाही आणि कोणीही त्यांची संमती घेतली नाही. हे कोणीही असू शकते ज्याने ते त्याच्या परवानगीशिवाय पोस्ट केले आहे, असेही साबरमती सेंट्रल जेलच्या अधीक्षक श्वेता श्रीमाळी म्हणाल्या. दरम्यान, नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या बिश्नोईला सप्टेंबर 2022 मध्ये कच्छच्या जाखाऊ किनार्‍यावरून 194.97 कोटी रुपये किमतीचे 38.994 किलो हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पहिल्यांदा ताब्यात घेतले होते. 

ट्रान्झिट वॉरंटवर भटिंडा कारागृहातून आणल्यानंतर त्याच हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात त्याच्यावर UAPA आरोप जोडल्यानंतर एटीएसने त्याला ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा ताब्यात घेतले होते. त्याला चार दिवसांच्या एटीएस कोठडीत पाठवल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत साबरमती सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी