शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:16 AM

Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेबाहेर जाणार असून, भाजपाला १०० जागासुद्धा मिळणार नाहीत, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की, बंगालमधून चॅलेंज आलंय की, यावेळी काँग्रेसला ४० जागादेखील मिळणार नाहीत. मी प्रार्थना करतो की, काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला टोला लगावताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अब की बार भाजपा सत्तासे पार, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तसेच भाजपा १०० जागासुद्धा निवडून येणार नाहीत. मोदींची गॅरंटी ही देशातील शेतकरी, दलित आणि मागासवर्गियांसाठी नाही आहे. तर ती मोदींच्या मित्रांसाठी आहे. ते केवळ कांघ्रेसला शिविगाळ करू शकतात. यावेळी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून खर्गे यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या मित्रांचं १३ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांना १२-१३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या कराव्या लागतात. मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये धानाचा किमान हमिभाव १३५ टक्क्यांनी वाढलं होतं. तर भाजपा सरकारच्या कार्यकाळात ही किंमत केवळ ५० टक्क्यांनी वाढली आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत बोलतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास किमान हमिभाव कायदा लागू केला जाईल, असं आश्वासन आम्ही देत आहोत, असेही खर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा