शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 07:19 IST

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारी हा आहे, युवकांना नोकऱ्या शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे’, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले की, ‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. आतापर्यंत २१ आयआयएम फक्त २० टक्के प्लेसमेंट पूर्ण करू शकले. जर भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये ही परिस्थिती असेल, तर देशभरातील तरुणांचे भविष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याची कल्पना येऊ शकते, या सरकारच्या काळात तरुण बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘पहली नोकरी पक्की’ हमी आणली आहे. 

नवादा (बिहार) : “काँग्रेस अध्यक्ष खरगे विचारतात की, राजस्थानशी कलम ३७० हटवण्याचा काय संबंध? पण मी त्यांना सांगू इच्छितो की, राजस्थानमधील अनेक वीरांनी काश्मीरमध्ये रक्त सांडले आहे. असे असताना खरगे विचारतात की, काय संबंध? त्यांची मानसिकता ‘तुकडे तुकडे गँग’ची आहे,” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभेत  रविवारी केली. 

आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा बिहारमध्ये पोहोचले आणि नवादा येथील कुंतीनगरमध्ये एका महत्त्वाच्या निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे छोटे पद नाही. कलम ३७० चा राजस्थानशी काय संबंध आहे असे ते म्हणतात. ही तुकडे तुकडे टोळीची मानसिकता आहे, असे माेदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे