शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

By admin | Published: April 14, 2016 12:54 AM

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.
खरीप २०१६-१७ संबंधीचे नियोजन राज्य शासन व जि.प.च्या कृषि विभागाने पूर्ण केले आहे. येत्या २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक कृषिमंत्री घेणार आहे. त्यातील सूचना लक्षात घेऊन आणखी नियोजनात बदल केला जाऊ शकतो.

सर्वाधिक कपाशी
जिल्‘ात खरिपाखाली सात लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असते. कपाशीचे सरासरी क्षेत्र चार लाख ६५ हजार हेक्टर एवढे आहे. मागील हंगामात कपाशीची चार लाख २२ हजार ८६२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ होण्याची अपेक्षा असून, हे क्षेत्र चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टर एवढे असेल, असा अंदाज आहे.

नॉन बीटीची फक्त एक लाखांवर पाकिटे
जिल्हाभरात बीटी कपाशीची सर्वाधिक लागवड होते. यामुळे नॉन बीटी म्हणजेच सुधारित संकरित कपाशीच्या बियाण्याची एक लाख ८ हजार १५ पाकिटांची मागणी केली जाणार आहे. तर सर्वाधिक २० लाख ६० हजार ७१२ बीटी कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली आहे.

खरीप हंगाम आढावा घेणार
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि व महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक घेणार आहे. त्यात हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, सूचना यासंबंधी चर्चा होईल. त्यानुसार आणखी नियोजन केले जाईल.

प्रमुख कंपन्यांकडे मागणी
कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. कापूस उत्पादकांना ऐनवेळी बियाण्यासंबंधी त्रास होऊ नये यासाठी बीटी कपाशी बियाणे निर्मात्या प्रमुख कंपन्यांकडे बियाण्याची जादा मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.