शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

तुम्ही मर्यादेत राहा, आम्ही अतिक्रमण करणार नाही; किरेन रिजिजू यांचा न्यायपालिकेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 6:41 AM

आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असे केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:केंद्र सरकार आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणार नाही आणि राज्याच्या अधिकार क्षेत्रावरही अतिक्रमण करणार नाही. तथापि, न्यायपालिकेने देखील त्याचे पालन करणे अपेक्षित आहे, असे मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.   

‘भारतीय न्याय व्यवस्थेसमोरील नवीन आव्हाने आणि संधी’ या विषयावर अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या १६ व्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य घटनेने ठरवून दिलेल्या मर्यादेचे कोणतेही उल्लंघन केल्याने प्रसारमाध्यमांना मसालासह बातम्या प्रसारित करण्याची संधी मिळते.  न्यायाधीश लोकांद्वारे निवडले जात नसले तरी त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे की, ते जनतेला देखील उत्तरदायी आहेत. आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत. सध्या कोणीही न्यायाधीशांना प्रश्न विचारू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

लहान वकिलांनाही संधी द्या...

काही मोठे वकील असे आहेत जे सर्व मोठ्या केसेस घेतात आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवितात. काही वकील तर कोर्टातील एका सुनावणीचे ३० ते ४० लाख आकारतात. या लोकांनी पूर्ण जागेवर कब्जा करू नये. लहान वकिलांनाही संधी द्यायला हवी. ते म्हणाले की, न्याय मिळण्यासाठी उशीर होऊ नये. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. काही वकील तर तारखाच मागत असतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Courtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार