शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kisan Kranti Padyatra : भाजपा सरकारवर किसान युनियनचा हल्लाबोल, पण आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 09:19 IST

Kisan Kranti Padyatra : भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन संपवण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन संपवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर रोखण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नवी दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा किसान घाटावर जाण्याची परवानगी दिली. तेथे पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. 

''किसान घाट येथे फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत'', असा आरोप करत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैट यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले.

पहिल्याच दिवशी गाजीपूरजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले होते. यावेळेस पोलिसांनी बळाचा वापरदेखील केला होता. यानंतर रात्री उशिरा शेतकऱ्यांना नवी दिल्लीत दाखल होण्याची परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसहीत किसान घाटच्या दिशेनं रवाना झाले. 

 

या आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या  - कर्जमाफी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. हा आर्थिक समस्येचा मुद्दा असल्यानं या मागणीवरुन शेतकऱ्यांची सरकारसोबतची चर्चा फिसकटली.  

- वीजदरात करण्यात आलेली वाढ मागे घ्यावी, ही शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वपूर्ण मागणी आहे. 

- गेल्या वर्षीपासून ऊसाची देणी थकीत आहेत. थकीत देणी देण्यात यावीत आणि साखर कारखाना मालक देणी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी. 

- 60 वर्षांच्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन लागू करावी. 

- लवकरात लवकर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात.   

- कर्जबाजारी शेतकरी आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळावी व हक्काचं घरदेखील मिळावं. 

- शेतमालाला योग्य दर मिळावा.  

- डिझेलच्या दरांत कपात करावी   

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली