शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

107 मुलांचा मृत्यू : कोटा येथील 'त्या' रुग्णालयात फिरत होते डुक्कर, दरवाजेही तुटलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:17 IST

डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 107 पर्यंत पोहोचला आहे.  

ठळक मुद्देराजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 107 पर्यंत पोहोचला आहे. रुग्णालय परिसरात डुक्कर फिरत असल्याची माहिती आयोगाने दिली.

कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत आणखी काही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 107 पर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मागील काही दिवसांमध्ये रुग्णालयाची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 

रुग्णालयाच्या खिडकीला असलेल्या काचा फूटल्या होत्या. दरवाजे तूटले होते. तसेच रुग्णालय परिसरात डुक्कर फिरत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू असल्याची भयंकर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी (4 जानेवारी) रुग्णालयात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.  

केंद्राची एक टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या प्रमुख प्रियंका कानूनगो यांनी आपल्या टीमसह रुग्णालयाचा दौरा केला. त्यावेळी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी देखील उपलब्ध नसल्याचे तसेच रुग्णालय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. तसेच रुग्णालयातील 15 पैकी 9 व्हेंटिलेटर सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

राजस्थानमधील बालमृत्यूवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू  होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला होता. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलBJPभाजपाcongressकाँग्रेस