शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:27 IST

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. तर नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकत्र येत आहे. महाआघाडीच्या रुपाने सत्ताधारी भाजपा आणि मित्रपक्षाला हरविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. 

११ एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक गमतीदार किस्सेदेखील घडताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत घडत असलं तरी प्रत्यक्षात महाभारतातील पात्रे मतदानाच्या रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून येतं. आश्चर्य करु नका, ही पात्रे खरी नाहीत मात्र महाभारतातील नावे असलेले मतदार रांगेत उभं राहून मतदान करताना दिसतात. निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, या निवडणुकीत महाभारतातील पात्रांची नावं असलेल्या मतदारांची संख्या लाखोमध्ये आहे. 

जवळपास ६.४४ लाख कृष्ण आपापल्या मतदारसंघात मतदान करणार आहेत. तर ३० लाख गीता घराच्याबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावणार आहेत. तसेच ९ लाख अर्जुनही मतदानाचा हक्क बजावत देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा भाग होणार आहेत. कर्णदेखील ईव्हीएम मशिनचं बटण दाबणार आहेत. तर महाभारतात हस्तिनापुराला जशीच्या तशी माहिती देणाऱ्या संजय नावाचे जवळपास २६ लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. तसेच ७५ धुतराष्ट्रही यादीत सहभागी आहेत. 

शंतनु, भीष्म, विचित्रवीर्य यांच्यासोबत धुतराष्ट्र आणि पांडुदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन सरकार निवडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय मतदार यादीत शकुनी, शिखंडी, गांधारी आणि पुतना नावांचाही समावेश आहे. महाभारताचे निर्माते वेदव्यास यांच्या नावाचे १६८५ मतदार आहेत तर ३२६ शकुनी नावाचे मतदार आहेत. कुंती आणि द्रौपदी नावाच्या मतदारांचीही मतदार यादीत नावे आहेत. ज्या मातीमध्ये महाभारत घडलं त्या कुरुक्षेत्र मतदारसंघात ३७२२ कृष्ण, ३१ पार्थ आणि ३०२९ गीता आणि १५६९ संजय नावाचे मतदार आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत