शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कुमार विश्वास यांचा केजरीवालांवर हल्लाबोल; दहशतवादी संघटनांचे सहानुभूतीदार तुमच्या घरी यायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 7:07 AM

Punjab Election 2022: कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

नवी दिल्ली : “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणी दहशतवादी म्हटलेले नाही. तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की दहशतवादी संघटनांचे सहानुभूतीदार गेल्या निवडणुकीच्या आधी तुमच्या घरी येत होते की नाही, असा प्रश्न माजी आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी विचारला आहे. 

विश्वास म्हणाले,“मी त्या गोष्टींना आक्षेप घेतल्यावर मला पंजाबमधील बैठकांतून काढून टाकले गेले आणि त्यानंतर मी अशी एक बैठक रंगेहाथ पकडली होती. या बैठकीबाहेर हरयाणातील सुरक्षारक्षकाचा पहारा होता. आणि जेव्हा मला बैठकीला तेच लोक उपस्थित असल्याचे आढळल्यावर मला सांगण्यात आले की ‘इसका बडा फायदा होगा’. कुमार विश्वास यांनी म्हटले होते की, “अरविंद केजरीवाल यांनी मला एके दिवशी म्हटले होते की, एक दिवस मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देशाचा (खलिस्तान) पंतप्रधान बनेन.”कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. चन्नी यांनी ट्विटरवर म्हटले की,“ राजकारण बाजूला ठेवा, पंजाबमधील जनतेने फुटीरवादाशी लढताना मोठी किमत मोजली आहे. प्रत्येक पंजाबीला वाटणाऱ्या काळजीचा माननीय पंतप्रधानांनी विचार करणे गरजेचे आहे.” 

सुरक्षेचा घेणार आढावाकुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा केंद्र सरकार घेत असून त्यांना केंद्रीय संस्थेकडून सुरक्षा दिली जाऊ शकते, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी म्हटले. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात असताना कुमार विश्वास यांनी केजरीवाल हे फुटिरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केलेला आहे. राज्यात २० फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.

आरोप हास्यास्पद -अरविंद केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे आणि शाळांच्या इमारती आणि रुग्णालये बांधणारा मी जगातील सर्वात मोहक दहशतवादी असलो पाहिजे, असे म्हटले. केजरीवाल म्हणाले, “भगत सिंग यांना ब्रिटिश दहशतवादी म्हणाले होते, परंतु, भगत सिंग यांच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही हे देशाला माहीत आहे. “नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, चरणजित सिंग चन्नी, सुखबीर बादल, अमरिंदर सिंग, नवज्योत सिंग सिद्धू हे सगळे केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून देशाला तोडण्याचा कट रचत असून, एका भागाचा पंतप्रधान व्हायची त्यांची इच्छा असल्याचा आरोप करीत आहेत. हे आरोप खरे असतील तर मला अटक का करण्यात आली नाही.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल