शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:10 AM

Kushinagar Incident : एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न मंडपात लग्नाच्या विधी सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री अनेक महिला व मुली एका विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांमुळे जास्त वजन पडल्यानं स्लॅब खाली कोसळला त्यामुळे सर्व महिला विहिरीत पडल्या.या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. 

जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो पण...

विहिरीत महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने कोणी आपली आई तर कोणी मुलगी गमावली आहे. लग्न मंडपात उपस्थित असलेल्या काही लोकांनी नेमकं काय घडलं त्याबाबत आता माहिती दिली आहे. मदतीसाठी रुग्णवाहिकेला 10 वेळा फोन केला. पण मदतीसाठी रुग्णवाहिका काही वेळेत पोहोचली नाही. खरं तर परिसरापासून रुग्णालय फक्त तीन किलोमीटरवर आहे. जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो. पण फोनवर प्रत्येक वेळी रुग्णवाहिका आता येतेच आहे असं उत्तर मिळत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. 

संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. तसेच जखमी झालेल्या काही महिलांना पोलिसांच्याच गाडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस