शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
3
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
4
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
5
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
6
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
7
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
8
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
9
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
10
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
11
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
12
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
13
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
14
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
15
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
16
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
17
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
18
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
19
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
20
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 4:30 PM

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवान दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम चालू केली आहे. मुकेश कुमार असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो काही काळ पुलवामा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता.

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नौपुरालगतच्या टुममध्ये आज दुपारी सव्वा एक वाजता स्थानिक लोकांनी गोळी झाडण्याचा आवाज ऐकला. स्थानिक लोकांनी जेव्हा त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा त्यांनी एक तरुण मृतवस्थेत पडलेला दिसला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. 

या घटनेची माहिती पोलीस आणि निमलष्करी दलाचे पथकला देण्यात आली होती. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मृत्यू झालेल्या मजुराच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी मुकेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलीस निरीक्षकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी हे ईदगाह मैदानात काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, तेव्हा काही दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांना गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

"गेल्या पाच वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये घट"दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दावा केला होता की, केंद्रशासित प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या पाच वर्षात ऑपरेशन्स दरम्यान कोणतेही कोलेट्रल डॅमेज झाले नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. या पाच वर्षांत पोलिसांच्या कारवाईत एकही नागरिक जखमी झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. तसेच, या वर्षात आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ३० घटना घडल्या आहेत, असेही दिलबाग सिंह यांनी सांगितले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी