शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

श्रीश्रींच्या संस्कृती महोत्सवामुळे जैव विविधतेची हानी

By admin | Published: August 18, 2016 5:34 AM

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही

नवी दिल्ली : आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या जागतिक संस्कृती महोत्सवामुळे संपूर्ण पूरक्षेत्र उद्ध्वस्त होऊन जैवविविधतेची अपरिमित हानी झाली असून, ती कदाचित कधीही भरून निघू शकणार नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काढला आहे. हा निष्कर्ष प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर आणि आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन या संस्थेसाठी धक्का मानला जात आहे. आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनने यमुनेच्या काठावर मार्च महिन्यात जागतिक संस्कृती महोत्सव घेतला होता. या महोत्सवामुळे पर्यावरणाची हानी झाली काय याचा अभ्यास करण्यासाठी एनजीटीने जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होेती. या समितीने आपला अहवाल नुकताच एनजीटीच्या सुपूर्द केला. या अहवालात म्हटले आहे की, कार्यक्रमाचे मुख्य स्थळ म्हणून वापर करण्यात आलेले पूरक्षेत्र (यमुना नदीच्या उजव्या तीरावरील डीएनडी उड्डाणपूल ते बारापुल्ला ड्रेनदरम्यानचा भाग) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सपाटीकरणासह पूरक्षेत्राची दबाई करण्यात आल्यामुळे जल संचयासाठी जागा उरली नाही. अनेक वनस्पती आणि झाडेझुडपेही नाहीशी होऊन जैवविविधतेचा ऱ्हास झाला आहे. द आर्ट आॅफ लिव्हिंगने हा अहवाल फेटाळला असून, पर्यावरण हानीचे आरोप अवैज्ञानिक, पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. आपण समितीच्या पुनर्स्थापनेची मागणी केली असून, एनजीटीने आपल्या अर्जावर अद्याप सुनावणी केलेली नाही, असेही या संस्थेने म्हटले. एनजीटी याबाबत २८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी करणार आहे. पर्यावरणीय हानीच्या भरपाईसाठी एनजीटीने गेल्या मार्चमध्ये द आर्ट आॅफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावून आणखी नुकसान होऊ न देण्याचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधीच झाला होता वाद३५ लाख लोक सहभागी झालेल्या या महाकार्यक्रमासाठी सात एकरचा मंच उभारण्यात आला होता. तात्पुरत्या बांधकामामुळे जैवविविधतेची अपरिमित हानी होऊ शकेल, असे एनजीटीने म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी पाठ फिरवली.