शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

आसामध्ये कमळ फुललं, काँग्रेसचा मोठा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2016 9:33 AM

ईशान्येकडील महत्वाच राज्य असलेल्या आसाममध्ये कमळ फुललं आहे. भाजपने आसाममध्ये दमदार पदार्पण करत काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

दीसपूर, दि. १९ - ईशान्येकडील महत्वाच राज्य असलेल्या आसाममध्ये कमळ फुललं आहे. भाजपने आसाममध्ये दमदार पदार्पण करत काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. गेल्या पंधरावर्षांपासून आसाममध्ये काँग्रेसची सत्ता होती. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 
 
भाजप सध्या ८३ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी आसाममध्ये ८४.७२ टक्के मतदान झाले. आसाममध्ये विधानसभेसाठी झालेले हे सर्वाधिक मतदान होतं. त्यावेळीच आसाममध्ये सत्ता पालट होणार असल्याचे संकेत मिळाले होते. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
तरुण गोगोई यांच्या विरोधात आसामच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर आसामचा निकाल भाजपाला दिलासा देणारा आहे. भाजपने आसाममध्ये बराच जोर लावला होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इथे झालेल्या सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपने इथे निवडणूकीपूर्वी आसाम गण परिषद, बोडेलॅण्ड या स्थानिक पक्षांक्षी हातमिळवणी केली. त्याचा भाजपला फायदा झाला. गरीबी, बांगलादेशी घुसखोर या राज्यातील प्रमुख मुद्दे आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. 
 
विद्यमान विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे ७९, एआयडीयूएफच्या १८, बीपीएफचे १२, आसाम गण परिषदचे नऊ आणि भाजपचे पाच आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आसामधून लोकसभेच्या १४ जागांपैकी साता जागा भाजपने आणि तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.