शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:05 IST

Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे.

Mallikarjun Kharge on Ladakh: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. विरोधकही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांनी लडाखच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. 

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये सहाव्या अनुसूची अंतर्गत राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने होत आहेत. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी लडाखच्या नागरिकांकडून होत आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. एक जम्मू-काश्मीर तर दुसरे लडाख. आता या प्रेदशाला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

काँग्रेस अध्यक्षांचे ट्विट:-

मोदींची गॅरंटी सर्वात मोठा विश्वासघात : खरगेमल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "लडाखमध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी समुदायांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. पण इतर सर्व गॅरंटीप्रमाणे, लडाखच्या लोकांना घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्याची 'मोदींची गॅरंटी' हा मोठा विश्वासघात असून, ही चायनीज गॅरंटी आहे."

चिनी सैन्याचा आपल्या भागात कब्जा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "मोदींना, आपल्या मित्र्यांना लडाखच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या हिमालयीन नद्यांचा फायदा मिळवून द्यायचा आहे. गलवान व्हॅलीत आपल्या 20 जवानांच्या बलिदानानंतर मोदींनी चीनला क्लीन चीट दिली. यामुळे चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहन मिळाले आहे. एकीकडे मोदी सरकारने आपली प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, तर दुसरीकडे लडाखमधील आपल्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर आक्रमण सुरू आहे. 2014 पासून भारत आणि चीनच्या 19 बैठका झाल्या, तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे. चीनने डेपसांग मैदाने, हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा भागात कब्जा केला आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाहLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सBJPभाजपाcongressकाँग्रेसladakhलडाख