शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

'लखीमपूरची घटना केवळ अपघात, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे अन्यायपूर्वक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 1:54 PM

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली - देशात गाजलेल्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा मुद्दा आज संसेदत गाजत आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना केंद्रीयमंत्रीनितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्‍यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला.

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. मात्र, लखीमपूर खेरी येथील घटना केवळ अपघात असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ''लखीमपूर येथील घटना ही जबरदस्ती नसून केवळ अपघात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. हे बघा, ते अन्यापूर्वक आहे, या घटनेची सविस्तरपणे माहिती आली आहे. जाणीवपूर्वक भावनेनं ही घटना घडली नसून हा एक अपघात आहे,'' या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

हा तर पूर्वनियोजित कट

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) याबबातची माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. 

विरोधकांनी संसदेत उठवला आवाज

दरम्यान, सत्ताधारी भाजप यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी लखीमपूर घटनेच्या घडामोडी मोठ्या डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आज संसदेतही विरोधकांनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपाministerमंत्री