शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आम्ही देशात पोलीओ मोहीम यशस्वीरित्या राबवली, पण मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही : लालू प्रसाद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 18:08 IST

Coronavirus Vaccination : सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत.

ठळक मुद्देसध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे.कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशी परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवणायचं असेल तर लसीकरण प्रक्रिया वेगवान करावी लागेल असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. परंतु लसीकरण मोहिमेवरून (Corona Vaccination Drive) राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (RJD President Lalu Prasad Yadav) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लालू प्रसाद यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तुलना १९९६-९७ सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी केली. तसंच सध्या सरकार पैसे घेऊनही लस उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचं म्हटलं. "१९९६-९७ मध्ये जेव्हा देशात जनता दलाचं सरकार होतं तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणात जागतिक विक्रम केला होता," असं लालू प्रसाद यादव म्हणाले. सध्या लालू प्रसाद यादव हे जामिनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत."त्यावेळी इतकी सुविधा आणि जागरूकताही नव्हतं. तरी ७ डिसेंबर १९९६ रोजी ११.७४ कोटी मुलांना आणि १८ जानेवारी १९९७ रोजी १२.७३ कोटी मुलांना पोलिओचे डोस दिले. तो भारताचा जागतिक विक्रम होता. त्यावेळी पोलिओ लसीकरणाविरोधात लोकांमध्ये भीती होती परंतु पोलिओला मूळापासून संपवण्याचा आमच्या सरकारनं दृढ निश्चय केला होता," असंही ते म्हणाले. पैसे देऊनही लस उपलब्ध नाही"आज लोकांकडून पैसे घेऊनही लस उपलब्ध करता येत नाहीये हे पाहून अतिशय दु:ख होत आहे. या महासाथीच्या काळाक देशभरातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांचं मोफत लसीकरण करण्याची त्यांनी घोषणा करावी असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहेत," असं लालू प्रसाद यादव यांनी नमूद केलं. राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत निरनिराळी असू नये. राज्यांमुळेच देशाची निर्मिती होते. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं मोफत झालं पाहिजे ही केंद्राची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवIndiaभारत